चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यात प्रशासनाने मोठी कारवाई करीत तब्बल ८० लाख रुपयाची चोरबीटी जप्त केली आहे. पोंभुर्णा तालुक्यातील भिमनी येथे भरारी पथकाने काल शेतात असलेल्या पक्क्या घरातून अनधिकृत बियाणांचा साठा हस्तगत केला.प्रशासनाच्या या कारवाईने चोरबीटी तस्करात एकच खळबळ माजली आहे. गेल्या काळातील हि सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील भिमनी येथील नीलकंठ गिरसावळे यांचं शेतातील पक्क्या घरात चोरबीटी चा मोठा साठा असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली. यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा,पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार,वीरेंद्र राजपूत कृषी विकास अधिकारी, चंद्रकांत ठाकरे कृषी उपसंचालक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर कोल्हे, तंत्र अधिकारी गुणनियंत्रण, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय,नागपूर ,लकेश कटरे मोहीम अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर,श्रावण बोढे,जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, चंद्रपूर, महेंद्र डाखरे कृषी अधिकारी, . विवेक उमरे,चंद्रकांत निमोड, नितीन ढवस, काटेखाये, कोसरे, जुमनाके, श्री.आत्राम व तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोंभुर्णा व चमू यांनी भिमनी येथील नीलकंठ गिरसावळे यांच्या शेतातील पक्क्या घरात तपासणी केली असता याठिकाणी ३९.८८ क्विंटल संशयास्पद अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा आढळून आला.७६.57 लक्ष रुपयाचे हे बियाणे असून प्रशासनाने हा माल ताब्यात घेतला आहे.सदरहू अनधिकृत संशयित कापूस बियाण्याचा साठा इतरत्र परिसरात कुठेही विक्री केली आहे काय याचा तपस कृषी विभाग व पोलीस विभाग करीत आहेत.
शेतीचा हंगाम सुरु झाला आहे. याची तयारी म्हणून चोरबीटी तस्कराचे मोठे जाळे सर्वत्र पसरले आहेत.अशात प्रशासनाने केलेल्या या मोठ्या कारवाईने तस्करात चांगलीच खळबळ माजली आहे.
बिग ब्रेकिंग……..! या गावात पकडली ८० लाख रुपयांची चोरबीटी प्रशासनाने केली मोठी कार्यवाही, तस्करात खळबळ
RELATED ARTICLES



